वास्तूशास्त्रा विषयी काही महत्वाच्या गोष्टी. या गोष्टींचा अवलंब करा, व आपल्या जीवनात सुख, समाधान, व लक्ष्मीचे आगमन करा. हळद, केशर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येण्यास मदत होते. रोख रक्कम हातात पडली, की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील एक रुपयाही खर्च करू नये.
दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. बुधवारी पैसे कोणालाही उधार देऊ नये, दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले असते. मंगळवारी पैसे देऊन कर्जफेड करावी. किंवा, शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे किंवा कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही.
संध्याकाळ नंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच, राहुच्या घोऱ्यात ही पैसे देणे आणि घेणे असे व्यवहार करू नये. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी, मात्र सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास, लक्ष्मी नाश पावते. दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते.
पूर्वेकडे असल्यास सुखाची प्राप्ती होते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी म्हणजे ती पूजा पूर्ण होते. पैशा संबंधित कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फुल मंदिरात वाहून, समोर आलेल्या अपंग भिकऱ्यास व वृध्द भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे,म्हणजे यश नक्कीच मिळेल.
घरात मनी प्लांट लावू नये, पैशांची चन-चन भासते. मनी प्लांट घराबाहेर असावा. “श्री स्वामी समर्थ” हा जप घरातल्या सर्वांनी किमान एकशे आठ वेळा म्हणावा. घरातील कोणाही एका व्यक्तीने रोज एक हजार वेळा जप करावा, धनलाभ होतो. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेतच, मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये.
पैसा पैशाकडेच जातो हे शाश्वत सत्य आहे. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी म्हणजेच अवदसा काढता पाय घेईल. आणि आपली लक्ष्मी चिरंतर नांदेल.
जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो, आणि सूर्योदयावेळी अथवा सूर्यास्ताच्या समई झोपतो, तो साक्षात विष्णू असेल तरीही लक्ष्मी त्याला सोडून जाते. जी व्यक्ती दररोज सूर्य नारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्या, व तेजाची प्राप्ती होते.
रुद्राक्ष धारण करण्यासाठी वय, धर्म, जात, लिंग, देश इत्यादी काहीही नाही. रुद्राक्षाचे पावित्र्य नेहमी राखायचे असते. त्यामुळे रुद्राक्षाची माळ झोपताना अथवा शरीर संभंध ठेवताना वापरू नये. रुद्राक्षाची माळ घालून मृत व्यक्ती जवळ जाऊ नये. कोणत्याही कारणाने रुद्राक्षाची माळ अशुद्ध झाली, तर ती दुधाने धुवून घेवून श्रद्धा पूर्वक तिची पूजा करावी व “ओम नम् शिवाय” या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा व नंतर रुद्राक्ष माळ धारण करावी.
दर गुरुवारी तुळशीला थोडे दुध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन एक किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालीसाचे अकरा पाठ करावेत, अनावश्यक खर्चाला पायबंद बसतो.
कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे, पैशा अभावी अडकलेली कामे यामुळे मार्गी लागतात. दर पौर्णिमेला रात्री बारानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत वृक्षावर म्हणजेच पिंपळावर असते. आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्र्वत वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात.
यामुळे आर्थिक अडचण कधीच उद्भवणार नाही. घरातील फरशी पुसताना थोडे खडेमिठ पाण्यात टाकावे, त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मी प्राप्तितले सर्व अडथळे दूर होतील. घरात, दुकानात किंवा कार्यालयात, मुरली वाजविणारा श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही.
नोकरी मध्ये प्रमोशन मिळत नसेल, तर हा उपाय करावा. सर्वांत प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल, तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा. आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा. दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी यामुळे प्रगती 101% होतेच होते.
ज्या ज्या वेळी आपण समुद्र किनारी फिरायला जाता, त्या त्या वेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ म्हणजेच नारळ, कुंकू अर्पण करून विसर्जित करावे. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये, व्यवसायिक ठिकाणी शंख वाजवावा, यामुळे कटकट निघून जाते. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.
घरामधे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा, त्यामुळे घरामध्ये दारिद्र येत नाही. उत्तर-पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं, आणि दक्षिण-पश्चिमेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावे, त्यावर मधुमध सुपारी व चार बिंदूनवर रुपया, हळकुंड , खारीक,व बदाम असे क्रमाने ठेवावे किंवा विड्याच्या पानावर अक्षता, सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवावे.
किमान सणासुदीला, वाढदिवशी तरी हे कार्य नक्की करावे. उपवास करून शरीरशुद्धी होते, यात्रा करून शरीर बलवान होते, जप करून मानसिक विकास होतो,अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते, धन आणि रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते, दान केल्याने धनदौलत व राज, ऐश्वर्या, लाभते.
वास्तूशास्त्रा नुरुप घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते. रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता आणि शरीर बलवनवता लाभते, पैशाची कधीही कमतरता भासत नाही. आश्र्वस्तची म्हणजेच पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे, व “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” हा मंत्र म्हणून एकशे आठ प्रदक्षिणा माराव्यात व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरंजन लावून ठेवावे.
तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील, कुलदैवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील. गुरुपुष्यामृत योगावर सराफाकडून किमान एक मिलीग्राम तरी सोने न विसरता, प्रसंगी पोटाला चिमटे घेऊन विकत आणावेच आणावे.
गुरुपुष्यामृत केव्हा आहे, हे पंचांगात किंवा कॅलेंडर मध्ये दिलेले असते. तो दिवस माहीत करून घ्यावा व लक्षात ठेवावा. पुरेसे सोने जमा झाले की, पत्नीलाच एखादा दागिना करावा. सोने गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करण्याचे कारण असे आहे, की ते विकायची पाळी कधीच येत नाही.
कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना चमचाभर गोड दही खाणे अत्यंत शुभ व लाभदायक असते. स्नान करूनच भोजन करावे, जेवण केलेल्या ताटात हात धुवू नये, मांडीवर व ताटात हात धुवून जेवू नये, दक्षिणेकडे तोंड करून जेऊ नये. एक लांबलचक मोरपीस विकत आणून, ते घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर सेलोटेप लावून चिटकवून ठेवावे.
रोज सायंकाळी त्याला उदबत्ती ओवाळावी. हा तोडगा ज्यांचे येणे अडकून पडले आहे, त्यांनी अवश्य करून पाहण्यासारखा आहे. तीन चार महिन्यात येणे असलेली रक्कम हटकून परत मिळते. व्यापार मंदावत चालला असेल, व्यापार बंद पडला असेल किंवा भांडवल असूनही व्यापार होत नसेल, अशा वेळी व्यापारामध्ये यश येण्यासाठी पुढील प्रभावी तोडगा अवश्य करावा.
दररोज सकाळी देवासमोर बसून “विष्णू सहस्त्रार्जुन जीवनाचा” जप करावा, तसेच तुळशीकाष्टाची पाने घेऊन “ओम नमो विष्णवे नमः” या मंत्राचा जप करावा. रोज गरम तव्यावर पोळी भाकरी भाजण्यापूर्वी दूध शिंपडावे, यामुळे घरातील आजारपण कमी होतात, जास्तीत जास्त अन्न दानाच्या योगे अनेक दोष नष्ट होतात.
जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओठ न हलवता, मनातल्या मनात “श्री श्री” या मंत्राचा जप अवश्य करत जावा. यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल, वारंवार धन जमा करण्याची संधी येईल. घरात नवीन केरसुणी आणल्यानंतर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी.
तिला पाय लावू नये, व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडावेळ उघडा ठेवावा, यावेळेस धूप दाखवावा. दसऱ्याच्या दिवशी एखाद्या गर्भश्रीमंत व चारित्र्यवान व्यक्तीने दिलेली आपट्याची पाने चांदीच्या अगर पितळीच्या डबीत ठेवून ती देवापाशी ठेवावी.
अशा तऱ्हेने मिळालेली आपट्याची पाने ही धन देणारी असतात. घरात ज्या खोलीत तिजोरी ठेवलेली असेल, त्या भिंतीचा रंग काळा, लाल, अथवा निळा नको, त्या भिंतीचा रंग पिवळा असावा. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्यापाण्याने घरातील फरशी पुसावी, मनःशांती लाभते. रोज सकाळी पहिली भाकरी गायीला, दुसरी भाकरी कुत्र्याला, व तिसरी भाकरी छतावर पक्षांसाठी ठेवावीत यामुळे पितृदोष नाहीसा होतो.
पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो. कोणाकडून कर्ज घेतले तर त्यातले पाच दहा रुपये त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावे, कर्ज लवकर उतरते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तु दोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे ही शास्त्रसंमत नाही. तोडफोड केल्याने सगळ्यात मोठा म्हणजे वास्तु भंगाचा दोष लागतो.
घराच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिक चे स्टिकर्स शक्यतो लावू नये. उंबरठ्यावर दर पौर्णिमेला तसेच अमावस्येला पाच कापराच्या वड्या जाळाव्यात. कान तुटलेले अथवा भेगा पडलेले कप, स्टीलची, काचेची अथवा प्लास्टिकची भेगा गेलेली भांडी, बंद पडलेली घड्याळ किंवा भंगार वजा सामान घरामधे ठेवू नये.
अशा वस्तू ताबडतोब घराबाहेर काढाव्यात. कारण या तुटलेल्या, फुटलेल्या, व भंगारवजा वस्तूमध्ये कलीचा वास असतो. एकाक्ष नारळाला विशेष महत्व का असते? बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात, क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो. एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपत्तिक म्हणजेच संपत्तीचा लाभ होतो.
म्हणून अशा एकाक्ष नारळाला चिंतामणी नारळ म्हणतात. असा नारळ फोडत नाही, त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात. विष्णू, सूर्य आणि शिव यांच्या मंदिरासमोर घर कधीही बांधू नये. घराच्या मुख्य दरवाजा पेक्षा घराचे आतील दरवाजे हे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत.
वास्तूचे आयुमर्यादा काढायचे असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या शेत्रफळाला आठ ने गुणून एकशेवीस ने भाग दिल्यावर जी संख्या उरते, तेवढे त्या गृहाचे अथवा इमारतीचे आयुष्य आहे असे समजावे. काटेरी वृक्ष घरामध्ये लावण्याचे प्रत्येकाने जरूर टाळावे. बाधित वास्तूसाठी काही उपाय करता येतात का?
यामधे काही तांत्रिक उपाय करून अशी बाधा दूर करता येते. मात्र त्यापेक्षा ‘श्री शप्तशतीची’ अवशकतेनुसार हवणात्मक नवचंडी किंवा शतचंडी करावी. ज्या व्यक्तींच्या घरात बेलाचा वेलं असतो, त्याघरामधे लक्ष्मीचा वास असतो. यशस्वी होण्यासाठी कर्तृत्वाला आणखी एका गोष्टीची जोड द्यावी, बायकोच्या व्यवहार चातूर्यची.
म्हणून आपल्या बायकोच्या भावभावनांचा थोडा विचार करा. आपल्या संसारात सुखी राहा. आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये. हे शतशः खरे आहे. त्यामुळे द्वार वैद्य हा दोष निर्माण होतो. तसेच प्रवेशद्वारांवर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हे ही निक्षून सांगितले आहे. सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये.
अशा शब्दात वृक्षवेदिकार याबाबत आग्रहापणाने सांगतात. घर मालकीण गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशांनी नवनाथ भक्तिसार 28 वा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा. नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गूळ रस्त्यावरील गाईला खायला द्यावा.
मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज संध्यकाळी सात नंतर वाचवा. आपल्या घरामधे आपली पत्नी, मुले,किंवा कोणालाही अपशब्द वापरू नये, वाईट बोलू नये, कारण वास्तु नेहमी तथास्तु म्हणत असते. वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचे दर्शन घ्यावे. रोज सकाळ, संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुहासाची अगरबत्ती किंवा धूप घरात जाळावे. आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावे.
दक्षिणेला तोंड करून गाडी ठेवू नये. शिकार केलेल्या प्राण्याचे मुखवटे, किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरॅमिक्स, घरात ठेवू नये. बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, हे चुकीचे आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात हे ही चुकीचे आहे.
तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. घरात विनाकारण कट कट होत असेल, तर घरामधे हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे. तरीही फरक न वाटल्यास पाच सुवासिनींना मानपान करावे व दूध द्यावे, असे केल्याने कटकटी कमी होतात. श्री वेद व्यास सुद्धा म्हणतात, ज्यांचे मन किंवा विचार मोठे त्यांचे भाग्यही मोठे, असा मानसशास्त्राचा प्रतेक्षाणुष्णी सिद्धांत आहे. ज्या वनस्पती मधून पांढरा चिक येतो, अशी झाडे घराभोवती कधीही लावू नये.
देवघरात देवाच्या फोटो समोर मृत व्यक्तीचे फोटो ठेवू नये. मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते. ज्या नवीन वास्तुस दारे, खिडक्या बसविलेल्या नाहीत अशा वास्तुमधे ब्राम्हण पूजा झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये. उंबरठ्यावर लक्ष्मीची पाऊल चिटकवू नये, कारण त्या लक्ष्मीच्या पावलांवर आपली पाऊले पडणे काही बरे नाही. या आहेत काही वास्तु संदर्भात माहिती.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.