“…तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू”; गृहमंत्र्यांनी केलं मोठं विधान..

Pune प्रादेशिक

तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रीय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नुकताच केला. दरम्यान, या प्रकरणी विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्याची मागणीही सुद्धा केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री यांनी विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करावेत, पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतल्याचे दिसून आले.

दरम्यान, तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच तलाठी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. या प्रकरणी विशेष तपास पथक SIT नेमून चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पुरावे सादर करा, जर ते मिळाल्यास परीक्षा रद्द करण्याचे आदेश देवू, असे आश्वासन दिले.. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यातील नवीन भाजप कार्यालयाला भेट दिली. त्यांनी कार्यालयाची पाहणी केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. तलाठी भरतीत राज्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

याबाबत विचारणा केली असता फडणवीस म्हणाले की, तलाठी भरती परीक्षा ही राज्यात अतिशय पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली असून जर या परीक्षेत कोणताही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही दिल्यास त्याची रितसर चौकशी करण्याची हमी दिली. याशिवाय, जर पुरावे योग्य असल्यास चौकशी करून ही परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवर कारवाईही केली जाईल,असेही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले..

याचबरोबर, अयोध्येत बनत असलेले राम मंदिर उद्गाटनाचा मुद्दा भाजपकडून लोकसभेच्या तयारीसाठी वापरला जात असल्याबद्दल विचारले असता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्री राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा हा राम भक्तांचा, कारसेवकांची तसेच रामावर श्रद्धा असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा असून श्रद्धा असलेला प्रत्येक जण या सोहळ्यासाठी जात आहे. याबद्दल कोणालाच दु:ख होण्याचे कोणतेच कारण नाही..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *