काही दिवसांतच म्हणजे येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं उद्घाटन होत असल्याचे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार यांना मात्र निमंत्रण दिले नसल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ नेते शरद पवार यांनी स्वत: याबाबत प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली.
लवकरच अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांचं भव्य असं मंदिर उभारलं जात आहे. या मंदिराचं उद्घाटन येत्या 22 जानेवारीला होणार असून मंदिर उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय भव्यदिव्य असा असल्याचे त्यासाठी देशविदेशातील अनेक VVIP लोकांना निमंत्रण दिले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण फार मोजक्या लोकांना दिलं जात आहे.
यामध्ये अनेक दिग्गजांचा देखील समावेश असून पण तरीही भारताच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण अद्याप आलेलं असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगायला सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण मिळालं की नाही? याबाबत आता लोकांमध्ये चर्चा सुरु होत आहे.
तसेच उद्धव ठाकरे राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात जाऊन श्रीरामांचं दर्शन घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तर शरद पवार यांनादेखील अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालेलं असून या वृत्ताला स्वतः शरद पवार यांनी दुजोरा दिलाय. सध्या शरद पवार जुन्नरच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
यावेळी त्यांना अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यावर त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. “अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे, पण मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मी म्हटलं काही हरकत नाही, पण मी मात्र स्वतः अयोध्येत जाणार आहे. मात्र 22 जानेवारीला जाणार नसून नंतर नक्की जाईन.कारण भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
तसेच याचबरोबर, सध्या अयोध्येला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ केलेली दिसून येत आहे. दरम्यान, 10 हजारांचे तिकीट 40 हजार रुपये करण्यात आले असून विमानसेवा अशी महागली आहे, अशावेळी कोणी अयोध्येला गेलं नाही तर त्या व्यक्तीला श्रीरामांबद्दल आस्था नाही, असा अर्थ काढणे चुकीचे राहील”, असं शरद पवार म्हणाले.
याशिवाय, आचार्य शंकराचार्य यांनी “राम मंदिराचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली असल्याचे सांगितले जाते.