देवघरात ठेवा या 3 वस्तू पैसा कधीच कमी पडणार नाही ।। अश्या कोणत्या वस्तू आहेत खालील लेखात जाणून घ्या !

कला चित्रपट

ओम नमो नारायण. आपण आपल्या आसपास असे अनेक लोक पाहतो की ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे, खूप श्रीमंत आहे, अगदी ते कोणतेही नियम न पाळता, देवपूजा सुद्धा न करता, या लोकांकडे इतका पैसा असतो की, आपल्याला आश्चर्य करायला लागते.

या लोकांकडे म्हणजे या लोकांच्या घरात जर तुम्ही गेलात तर, देवघरामध्ये रोज पुजा सुद्धा केली जात नाही. देवघरामध्ये अगदी धूळ साठलेली असते. आपल्याला प्रश्न पडतात की, अशाप्रकारे जर या लोकांच्या घरांमध्ये देवपूजेचे नियम पाळले जात नसतील आणि तरी सुद्धा हे लोक श्रीमंत असतील, तर या पाठीमागचा कारण काय?

आम्ही तर दररोज देवपूजा करतोय, अगदी देवाचे सर्व नियम पाळतो, धर्मशास्त्रानुसार वागतोय, तरीसुद्धा आमच्याकडे गरीबी का आहे, आमच्याकडे पैसा का राहत नाही, आम्ही इतकी मेहनत करतोय तरी आम्ही गरीबच का राहतोय. तरी माता लक्ष्मी आमच्याकडे का येत नाही, या तीन गोष्टी नेहमी लक्षात घ्या की, भगवंताची कृपा तुमच्यावर व्हायला हवी.

भगवान विष्णू किंवा इतर कोणतीही तुमची इष्ट देवता तुमच्यावर तरी प्रसन्न होयला हवी. दुसरी गोष्ट म्हणजे वास्तूशास्त्र. वास्तुशास्त्राचे नियम हे तुम्ही पालन करायला हवे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं नशिब, तुमचं भाग्य की,जे तुमचा जन्म होण्यापूर्वीच लिहिण्यात आलेलं आहे.

या तीन गोष्टींचा संयोग ज्या वेळी होतो. त्याचवेळी तुमचं जे भाग्य आहे, ते चमकत. त्याचवेळी वास्तुशास्त्राचे नियम पाळले जातात. आणि भगवंत सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतात. यातली एकजरी गोष्ट साध्य झाली तरी सुद्धा आपल्या जीवनातील अनेक प्रश्न सुटतात.

आपण जसे की पाहतो, इतर लोकांच्या घरी गेलो, हे जे लोक आहेत ते कोणतेही नियम पाळत नाही, तरी हे लोक श्रीमंत का? या लोकांचे नशीब अशा प्रकारे लिहिण्यात आलेले आहे की, अशा प्रकारचे आहे केलेले आहेत, किंवा यांची पूर्वजन्मीची कर्म, पुण्य अश्या प्रकारचे आहेत की, त्यांनी इतकी पुण्यकर्म केली आहेत की, या जन्मामधे त्यांना काहीही करण्याची गरज नाही.

या जन्मात ती केवळ फळ उपभोगण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे त्यांची आणि आपली बरोबरी, तुलना करत बसू नका. आपण कोणते उपाय करायचे आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अश्या तीन वस्तू ठेवा. या तीन वस्तू ठेवल्या नंतर तुमचं नशीब चमकल्या शिवाय राहणार नाही.

तुमच्या नशिबामधे काही असो किंवा नसो. मात्र तुमच्या घरामधे माता लक्ष्मी नक्कीच स्थिर होईल. तुम्हाला गरजेच्या वेळी पैसा कमी पडत असेल, तर हे उपाय नक्की करा. तुम्हाला पैशांची कमी कधी पडणार नाही. घरामधे सर्व प्रकारच्या सुखं सुविधा नक्की निर्माण होतील.

आणि याच बरोबरीने समाधान सुद्धा, शांती सुद्धा, तुमच्या घरांमधे स्थापित होईल. त्यापैकी जो पहिला उपाय, तो उपाय म्हणजे आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही नक्की ठेवा. आपल्या देवघरात जर माता लक्ष्मीची, लक्ष्मी मातेची जर तस्वीर असेल, फोटो असेल तर, फोटो पेक्षा मूर्ती ठेवण हे जास्त श्रेयस्कर मानलं जातं.

धर्मशास्त्रमधे मूर्तीच मोठ महत्व आहे. आणि म्हणून माता लक्ष्मीची मूर्ती. आणि लक्षात ठेवा ही जी मूर्ती आहे, बरेचदा अनेकांच्या देवघरामध्ये आपण पाहतो की, ही मूर्ती उभी असलेली असते. म्हणजे उभी अवस्थेतली असते. माता लक्ष्मी ही कधीही बसलेल्या अवस्थेमध्ये आपल्या देवघरात असायला हवी.

बसलेल्या पोझिशन मधील माता लक्ष्मीची, देवी लक्ष्मीची, मूर्ती ही नक्की आणावी. त्याची भक्तीभावाने पूजा करत रहा. अगदी दररोज रोज पूजा व्हायला हवी. आणि किमान आठवड्यातून एक दिवस शुक्रवार असेल किंवा मंगळवार असेल, शक्यतो शुक्रवारचा दिवस.

तर या दिवशी आपल संपूर्ण देवघर हे स्वच्छ करून माता लक्ष्मीला जे काही सोपस्कार असतात. ते सर्व सोपस्कार करून, आरती आपण म्हणायला पाहिजे. माता लक्ष्मीची आरती म्हणा आणि त्यानंतर पाच फळांचा भोग, पाच फळांचा प्रसाद आपण माता लक्ष्मीला अर्पण करायला हवा.

हे जर नित्य नियमाने केलं तर, तुम्हाला दिसेल की तुमच्या घरातील आर्थिक दारिद्र्य किती लवकर संपत, गरिबी किती लवकर निघून जाते, पैसा कश्या प्रकारे येऊ लागतो. त्यातल्या त्यात ज्यांना झटपट उपाय हवा आहे. बऱ्याच दिवसापासून घरामध्ये गरिबी आहे, दारिद्र्य आहे, तर ही जी लक्ष्मीची मूर्ती आहे, ती जर तुम्ही चांदीची बनवली किंवा चांदीची मूर्ती जर आपल्या घरामधे स्थापित केली.

खूप मोठी मूर्ती करण्याची गरज नाही. आपल्या अंगठ्या एवढ्या आकाराची किंवा त्याच्या आसपास. आपला जो अंगठा असतो त्याच्या आकारा एवढी जरी मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये स्थापित केली तरी सुद्धा त्याचे खूप चांगले फायदे होतात. तर चांदी हा जो धातू आहे तो मुळातच पैशांना आपल्याकडे आकृष्ट करतो. माता लक्ष्मीला आकृष्ट करतो.

आणि म्हणून चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती जर स्थापित केली तर खूप शुभ परिणाम आपल्याला नक्की मिळतात. दुसरी गोष्ट आपण बुधवारच्या दिवशी गणेशांच्या मंदिरात नक्की जा.श्री गणेशांच्या, गणरायाच्या गणपती बाप्पाच्या मंदीरामधे आपण जायचं आहे.

आणि त्या ठिकाणी अगदी आपली कुवत असेल, क्षमता असेल, त्यानुसार एकशे एक असेल, एक हजार एक असेल, जितकी तुम्हाला दक्षिणा द्यावीशी वाटते त्याठिकाणी. तर अश्याप्रकारे ते पैसे त्याठिकाणी अर्पण करा. आणि त्यानंतर तिथे पुजारी असतील किंवा नसतील.

पुजारी जर असतील तर त्यातला एक रुपया परत मागून घ्या. किंवा ते नसतील तर पैसे भगवंताच्या चरणी अर्पण करा. श्री गणेशाच्या चरणी अर्पण करा आणि त्यातली एक रुपया काढून घा आणि तो एक रुपया आपल्या घरी घेवुन या. घरी आणल्यानंतर आपल्या देवघरामध्ये तो ठेवा.

आणि त्याच्या वरती आपण एक सुपारी ठेवायची आहे . आणि त्यानंतर दररोज आपण देवपूजा करतो, अगदी देवपूजा करतानाच या सुपारीची आणि एक रुपयाची सुद्धा आपण पूजा करायची आहे. हा उपाय केल्याने आपल्या पैशामधे भरपूर प्रमाणात वाढ होते, धनसंपत्ती मधे वाढ होते.

‘दीन दूगनी, रात चोगणी ‘ प्रगती ज्याला आपण म्हणतो, अतिशय वेगाने घरातील पैशांमध्ये वाढ होते. आपला उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, नौकरी असेल, त्यासर्वांमधे प्रगतीची दार उघडतात. तर असा हा उपाय सुद्धा अतिशय सोपा आहे. आणि त्यानंतर प्रत्येक बुधवारी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेण्यास मात्र विसरू नका.

गणपती बाप्पांना जे मोदक आवडतात, तर त्या मोदकांचा भोग सुद्धा तुम्ही दर बुधवारी त्याठिकाणी लावू शकता. तर असे हे उपाय तुम्ही नक्की करून पाहा. वास्तुशास्त्रा नुसार सुद्धा फायदा होतो. तुमचं नशिब सुद्धा चमकत. आणि भगवंत सुद्धा प्रसन्न होतात. तर ह्या तीन गोष्टी, या तीन गोष्टींना प्रसन्न करणेसाठी आपल्याला सर्व काही करायचं आहे.

आणि सोबतीने मेहनत करण्यास, कष्ट करण्यास, परिश्रम करण्यास, मात्र विसरू नका. नाहीतर वर सांगितले तुम्ही कोणताही उपाय करा, तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही. हे लक्षात घ्या की, या उपायांना तुम्ही परिश्रमाची, कष्टाची जोड दिली नाहीतर यातील एकही उपाय सफल होणार नाही. ज्यांना कष्ट करायचे नाहीत, त्यांनी वरील कितीही उपाय केले तरी त्यांना याचा फायदा होत नाही.

तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे, दररोज तुम्ही कोणताही मंदिरात जा, त्याठिकाणी त्यादेवतेच दर्शन घ्या. आणि दर्शन घेतलेनंतर प्रसाद वैगरे अर्पण करा. आणि दर्शन घेतल्यानंतर त्या देवतेच्या पायाजवळ फुल असेल किंवा त्या मंदिरामध्ये जे फुल कोणीतरी अर्पण केलं असेल, तर हे फुल घ्या. किंवा तिथले जे पुजारी असतात, त्या पुजारी बाबांना हे फुल देण्याची विनंती करा.

हे देवाला वाहीलेल फुल घेवून आपण आपल्या देवघरामध्ये ठेवा.अगदी दररोज नित्य नियमाने आपण जर दररोज सकाळी एखाद्या मंदिरामध्ये असलेलं फुल आपल्या मंदिरामध्ये ठेवलंत तर, त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. माता लक्ष्मीला फुल खर तर खूप आवडतात. आणि अश्या प्रकारचा उपाय ज्यावेळेला आपण करत असतो.

त्यावेळी आपल्या घरातील वास्तूदोष तर दूर होतातच, मात्र घरामधे सुख शांती सुद्धा राहते. पैशांमध्ये सुद्धा वाढ होते, बरकर होते. ‘दीन दुगनी, रात चोगणी’, ही प्रगती ज्याला आपण म्हणतो, झपाट्याने प्रगती, होत असते. हे अश्या प्रकारचे तीन उपाय नक्की करून पहा. तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा ही नक्की होईल. || ओम नमो नारायणा ||

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *